शासनाच्या रखडलेल्या लघुलेखन परीक्षा झाल्याने विद्यार्थी समाधानी ; टायपिंग संघटनेच्या पाठपुराव्याला यश
पुणे : शॉर्टहँड आणि विद्यापीठाच्या परीक्षा एकत्र आल्याने विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला होता परंतु जागृत संघटनांनी आवाज उठून अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केल्याने रद्द झालेल्या परीक्षा पुन्हा घेण्यात आल्याने संघटनेच्या या लढ्यास यश आले आहे.
महाराष्ट्र परीक्षा परिषदेच्या संगणक, लघुलेखन आणि टायपिंगच्या परीक्षा होत असतात,
मात्र जुलै २०२२मध्ये झालेल्या शॉर्टहॅण्ड परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांच्या विद्यापीठ परीक्षा सुध्दा आल्या होत्या. लॉकडाऊन पासून बरेच विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरसाठी नोकरीसाठी अत्यावश्यक असलेल्या लघुलेखन परीक्षांबाबत अनियमितता आली होती. दोन वर्षे अभ्यास, सराव व वेळ देऊन पुन्हा शॉटहॅण्ड परीक्षेला विद्यार्थी बसू शकणार नाही की काय आणि पुन्हा नोकरीच्या वाटा बंद होतील की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातील जिल्ह्यातील शॉर्टहँड आणि विद्यापीठाच्या परीक्षा एकत्र आल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय झाली होती याबाबत कोल्हापूरच्या अभिलाषा नाईक, पुण्याचे हेमंत ढमढेरे यांनी टायपिंग संघटनेच्या माध्यमातून परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून हा मुद्दा प्रकर्षाने मांडला होता, परीक्षा मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी आणि इतर अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत परीक्षा पुन्हा घेण्याचे आश्वासन दिले होते,
त्यानुसार महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त शॉर्टहँड परीक्षा घेण्यात आल्याने विविध जिल्ह्यातून आलेल्या विद्यार्थ्यांनी अभिलाशा नाईक, हेमंत ढमढेरे व परीक्षा परिषदेचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्या आभार मानले.
शॉर्टहँड आणि विद्यापीठाच्या परीक्षा एकत्र आल्याने अनेक विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार होते त्यांनी खूप दिवस परिश्रम घेतले असताना परीक्षास मुकावे लागत होते परंतु संघटनेच्या माध्यमातून अभिलाषा नाईक व आम्ही पाठपुरावा केल्याने परीक्षा परिषदेचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्या आदेशानुसार पुन्हा परीक्षा घेण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टळले आहे अशी माहिती हेमंत ढमढेरे यांनी यावेळी दिली.
यावेळी अभिलाषा नाईक व हेमंत ढमढेरे तसेच परीक्षा परिषदेचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्यामुळे आमच्या परीक्षा पुन्हा झाल्या त्यामुळे आमचे मोठे नुकसान टळले आहे, त्याबद्दल या सर्व अधिकाऱ्यांच्या आभार असे प्रतिक्रिया विविध जिल्ह्यातून आलेल्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. यावेळी महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विद्यार्थ्यांना पेढे वाटप करण्यात आले.